Posts

Showing posts from October, 2018

मुलगी वाचवा

Image
                                        बालिका दिन विशेष    मातृदेवो भव । असा संस्कार घडवणारी आपली महान संस्कृती. स्त्री हाच जीवसृष्टीचा मूलाधार आहे अशी संत महात्म्यांची स्वीकृती स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही काव्यप्रकृती स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटणे ही प्रभू रामचंद्रांची प्रवृत्ती शिवबा विनोबा आणि बापूजी हे मानवश्रेष्ठ ही यशाचे श्रेय मातेला देती.       बापूजी म्हणतात ,' एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे , ही माता काय नाही करत ? अनेक भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे , निःस्वार्थीपणे , आपुलकीने , वात्सल्याने पार पाडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते. ती वेगवेगळ्या रूपाने आपली कर्तव्ये बजावत असते. आई होऊन नयनांचा दिवा आणि तळहाताचा पाळणा करून लेकरांना सांभाळते. त्याच्या कुसुमकोमल मनावर संस्कार घडवते. जिजाऊ होऊन शिवबासारखे थोर राष्ट्रपुरुष घडविते. हिरकणी होऊन बाळासाठी प्राणाची बाजी लावते. लतादीदींसारखी बहीण होऊन भावंडांच्या ...

वाचा ही कथा दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?

Image
                                                     रघुवंशम् मधील ही कथा            महाकवी कालिदासाने रचलेले रघुवंशम् हे काव्य अतिशय प्रसिद्ध आहे. यामध्ये पाचव्या सर्गामध्ये महाराज रघु यांच्या जीवनावरील घडलेल्या घटनेचे वर्णन कवीने केले आहे.           एका तपोवनामध्ये वरतंतु नावाचे अतिशय बुद्धिमान , अध्यापणामध्ये पारंगत आणि स्वभावाने अतिशय दयाळू असे ऋषी राहत होते. आपल्या अध्यापनातील कौशल्याने त्यांनी असंख्य शिष्यांमध्ये संस्कारबीजे रोवली होती. त्यामुळे शिष्यांसोबत त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याच आश्रमामध्ये पैठणमधील देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा कौत्स हा विद्यार्जन करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. आता त्याची आश्रमातून निरोप घेण्याची वेळ आली होती. आपल्याला गुरूने विद्या शिकविल्या, शास्त्रांमध्ये पारंगत केले. यामुळे आपण आपल्या गुरूला का...

वाचन प्रेरणा दिन

Image
                                                                              वाचन प्रेरणा दिन                  शीलं सद्गुणसम्पत्ति: ज्ञानं विज्ञानमेव च ।                उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।।           अर्थात - ज्याने चारित्र्य , चांगल्या गुणांची संपत्ती , ज्ञान विशेष ज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितकारकच असते.           खरं तर यामुळे ग्रंथ हे आपल्या जीवनाला आकार देणारे असतात. वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत होतोच त्याबरोबर जगाकडे पाहत असताना त्याला चांगलं आणि वाईट शोधण्याची एक अलौकिक दृष्टी प्राप्त होते. यामुळे त्याची समृद्ध जीवनाकडे वाटचाल होते.                  १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा...